पोटच्या दोन मुलांना दगडान ठेचून त्यांचा खून करुन मृतदेह विहिरीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना बुंदेलखंडच्या झाशी जिल्ह्यात रानीपूर येथे घडली आहे. त्यांनतर या व्यक्तीनं स्वत:चा गळा कापून विहीरत उडी घेतली. कौटुंबिक वादातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहिती द्वारे समोर आले आहे. रहिश असे पित्याचे नाव असून हर्ष (वय १२), अंश (वय ९) असे मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.
२२ मे रोजी रहिशचे आपल्या पत्नीबरोबर जोरदार भांडण झाले होते. रहिशला दारूचे व्यसन असल्यामुळे तो आपल्या पत्नीसोबत वारंवर भांडण करत असे. दरम्यान रहिश आपल्या मुलांसह कपडे घेण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडला.
संध्याकाळ झाली तरी ते तिघंही परतले नाहीत. त्यामुळे घरच्यांनी त्यांचा शोध सुरू केला. हा शोध सुरू असताना येथील नागरिकांना लाडगंज येथील केदारेश्वर मंदिराजवळील विहिरीच्या ठिकाणी रक्ताचे डाग पाहिले. यामुळे विहिरीत वाकून पाहिले असता विहिरीमध्ये त्यांना रहिश आणि त्यांच्या दोन्ही मुलांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली व मृतदेह बाहेर काढून पोस्टमोर्टमला पाठवण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनूसार, कौटुंबिक वादातून रहिशने हे जीवघेणं कृत्य केल्याचा संशय आहे. सुरुवातीला त्याने लहान मुलांची हत्या केली त्यानंतर स्वत:चा गळा कापून विहिरीत उडी मारली त्यात त्याचाही मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख व पंचायत समितीचे माजी सदस्य, श्री विठ्ठल…
पर्यावरण संरक्षणसाठी संबोधनासह केले विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ…
कु. सोनिया नवले यांची अमेरिकेतील जागतिक कीर्तीच्या इलिनॉईस विद्यापीठातून एम.एस. पदवी संपादन एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी…
प्रथम वर्ष च्या निकालामध्ये जिल्ह्यात अव्वल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या…
संभाजी ब्रिगेडची प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याकडे निवेदन देत मागणी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती…
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…