ताज्याघडामोडी

योग्य कोण? पंतप्रधान की तुम्ही?; जयंत पाटलांचा फडणवीसांना सवाल

मुंबई: करोनाविरोधी लढ्यात महाराष्ट्र सरकार करत असलेल्या चांगल्या कामाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. ही संधी साधत राज्याचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सणसणीत टोला हाणला आहे.

महामारीला सुरुवात झाल्यापासून फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते या-ना-त्या कारणावरून राज्य सरकारवर टीका करत आहेत. एकीकडं भाजप लॉकडाऊनला विरोध करतोय, तर दुसरीकडं राज्यातील करोनाग्रस्तांचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप केला जात आहे. फडणवीस यांनी कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उजेडात येत नाही, चाचण्यांमध्ये तडजोड करत करोना संसर्गाचा दर कमी होत असल्याचं आभासी चित्र उभं केलं जात आहे. त्यामुळं करोनाविरोधी लढ्यात अडथळे येत आहेत, याकडं फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे. काही महिन्यांची तुलनात्मक आकडेवारीही फडणवीसांनी पत्राद्वारे दिली आहे. बनवाबनवी करून जनतेची दिशाभूल करणं बंद करा, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

या पत्रावरून जयंत पाटील यांनी फडणवीसांवर खोचक शब्दांत टीका केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी मुख्यमंत्री ठाकरे यांना फोन करून करोनाच्या बाबतीत राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं. पाटील यांनी ट्वीटच्या माध्यमातून फडणवीसांना त्याची आठवण करून दिली आहे. ‘महाराष्ट्र सरकारनं केलेल्या प्रयत्नांचं पंतप्रधानांनी नुकतंच कौतुक केलंय. याची आपल्याला जाणीव असेल अशी आशा आहे. आता मुख्य प्रश्न असा आहे की योग्य कोण? माननीय पंतप्रधान की तुम्ही?,’ असा खोचक सवाल पाटील यांनी फडणवीसांना केला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर शहर तालुक्यातील शासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात यावी

संभाजी ब्रिगेडची प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याकडे निवेदन देत मागणी    स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती…

5 days ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा ९२%निकाल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…

3 weeks ago

१९ एप्रिल रोजी शिवस्वराज्य पंढरीरत्न राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…

4 weeks ago

मा.आ.प्रशांत परिचारक यांना विधान परिषद नाही तर विधानसभेचे आमदार करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ आग्रही ?

सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर  परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…

1 month ago

भावनिक क्षणांत रंगला सिंहगडमध्ये अंतिम वर्षाचा निरोप समारंभ

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये निर्भया पथकाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…

1 month ago