शेतकर्‍यांचा वीज पुरवठा खंडित करणे त्वरित थांबवा

मागील काही दिवसापासून पंढरपूर,सांगोला,माळशिरस,मंगळवेढा आदी तालुक्यातील शेतकर्‍यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा कुठलीही पूर्वसूचना न देता व थेट डीपीतून खंडित केला जात असल्याच्या तक्रारी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांकडे प्राप्त होत होत्या.याची तात्काळ दखल घेत सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील,शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे,भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत,महिला आघाडी जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक वरिष्ठ पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी महावितरण पंढरपूरचे कायर्कारी अभियंता सचिन गवळी यांची भेट घेत जनतेकडून प्राप्त होत असलेल्या तक्रारीची माहिती दिली व वीज बिल वसुली प्रक्रिया आणि वीज पुरवठा खंडित न करण्याबाबत महत्वपूर्ण चर्चा केली.  
      या बाबत शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील,पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता यांच्या निदर्शनास अनेक बाबी आणून दिल्या आहेत.राज्य शासनाने मागील थकीत वीज बिलात 50 टक्के माफीची घोषणा केली आहे.मात्र 2017 पासूनचे कृषी पंपाचे बिले अनेक शेतकर्‍यांना मिळालेच नाहीत.तर अनेक ठिकाणी थेट कुठलीही पूर्वसूचना न देता डीपीतून वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे हा प्रकार चुकीचा असल्याचे कार्यकारी अभियंता गवळी यांच्या निदर्शनास आणले.व लोकांचे प्रबोधन करा,त्यांना पूर्वसूचना द्या अशा सूचना केल्या.तर भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांनी थेट डीपीवरून सर्वच शेतकर्याचे कनेक्शन कट करणे चुकीचे असून त्यामुळे अंशतः अथवा पूर्ण बिल भरलेल्या शेतकर्‍यांवर अन्याय होत असल्याची बाब कार्यकारी अभियंता गवळी यांच्या निदर्शनास आणून दिली.यावेळी आमदार शहाजी पाटील यांनी शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन पूर्वसूचना न देता कट करण्याऐवजी वाढीव वीज बिलाबाबतच्या तक्रारींचे निराकरण करून प्रति हॉर्स पॉवर 1 हजार रुपये प्रमाणे भरावेत,जिल्हा परिषद गट निहाय कक्ष स्थापन करुन वाढीव वीज बीलाच्या तक्रारीचे निराकरण करावे,स्पीकरच्या माध्यमातून सार्वजनिक सुचना करीत शेतकर्‍यांचे प्रबोधन करावे अशी सूचना केली.
         यावेळी बाबुराव गायकवाड,शहाजी नलवडे,तानाजी देशमुख,शिवसेना जिल्हा उपप्रमुख सुधीर अभंगराव,पंढरपूर तालुका प्रमुख महावीर देशमुख,सांगोला तालुका प्रमुख सूर्यकांत घाडगे,संजय घोडके,जयवंत माने,माउली अष्टेकर,काका बुराडे,पोपट सावंतराव,अविनाश वाळके,तानाजी मोरे,दीपक गवळी,लकुमान इनामदार,शंकर मेटकरी,सचिन काळे,संतोष खडतरे,अर्जुन वाघ आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.        

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

5 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago