ताज्याघडामोडी

वारकरी संप्रदाय हा अंधश्रद्धा न बाळगता विज्ञान आणि सुधारणांना प्राधान्य देणारा – आचार्य शुभम कांडेकर

पंढरपूर – “महिला संतांनी निर्माण केलेल्या अभंगाचा समावेश संप्रदायात करून त्यांना सन्मानित करण्याचे महान कार्य वारकरी संप्रदायाने पूर्वीपासूनच केले आहे. वारकरी संप्रदाय हा अंधश्रद्धा न बाळगता विज्ञान आणि सुधारणांना प्राधान्य देणारा आहे. प्रत्येक क्षेत्रात कार्य करण्यासाठी संत साहित्यात मार्ग सापडतो.” असे प्रतिपादन आचार्य शुभम कांडेकर यांनी केले.
     रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात इतिहास विभागाच्या अंतर्गत सी.पी.ई. व वारकरी अध्यासन केंद्राच्या वतीने आयोजित ऑनलाईन व्याख्यानात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे हे होते.
     आचार्य शुभम कांडेकर पुढे म्हणाले की, “बाराव्या शतकापासून सामाजिक सलोखा निर्माण करून अध्यात्मिक लोकशाही निर्माण करण्याचे कार्य संत साहित्याने केले आहे. मानसिक ताणतणाव यातून मुक्ती मिळविण्यासाठी व मानसिक स्वास्थ्य टिकविण्याचा सल्ला संतानी दिला आहे. विज्ञानाने लावलेले अनेक शोध संतांनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये सापडतात. म्हणून संत साहित्य हे विज्ञानाला प्रेरक असे आहे. वारकरी संप्रदाय अखिल मानव जातीच्या हिताचा विचार करते म्हणूनच वैश्विक कुटुंबाची संकल्पना संत साहित्यात सापडते.”        अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे म्हणाले की, “संतांचा विचार हा सर्व समावेशक आहे. त्यात त्यांनी विविध प्रकारच्या भेदांना टाळून विश्व बंधुतेची संकल्पना मांडली आहे. पंढरपूर ही देशाची अध्यात्मिक राजधानी असून समाजजीवनात समतेचा संदेश दिला आहे. म्हणून पंढरपूर हे महान क्षेत्र आहे”
     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ. हनुमंत लोंढे यांनी केले. तर प्रमुख पाहुण्याचा परिचय डॉ. उमेश साळुंखे यांनी करून दिला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. निंबराज तंटक, उपप्राचार्य चंद्रकांत रासकर, उपप्राचार्य डॉ. लतिका बागल, अधिष्ठाता प्रोफेसर डॉ. तानाजी लोखंडे, रुसा समन्वयक डॉ. बजरंग शितोळे, स्वायत्त समन्वयक डॉ. मधुकर जडल, विद्यार्थी कल्याण विभागाचे समन्वयक डॉ. सुखदेव शिंदे, महाविद्यालय अंतर्गत सुधार समितीचे समन्वयक डॉ. अमर कांबळे,सी.पी.ई. समन्वयक डॉ. समाधान माने, प्रा.डॉ. दत्तात्रय डांगे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भारती सुडके यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. रविराज कांबळे, प्रा. जालिंदर वाघ, प्रा. बाळासाहेब गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा.सुमन केंद्रे यांनी मानले
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

6 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago