ताज्याघडामोडी

शेतकऱ्यांना आता मिळणार दिवसा ८ तास वीज पुरवठा

राज्यातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घेतला आहे. राज्यात विजेचे दर कमी करण्यासाठी व शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज पुरवठा देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत महावितरणला दिले.

वीजबिल माफीवरुन वादात सापडलेल्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अखेर राज्यातील सर्वसामान्य जनता तसेच शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात वीजेचे दर कमी करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना दिवसा ८ तास वीज पुरवठा देण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश त्यांनी महावितरणला दिले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना तसेच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नवीन कृषिपंप वीज धोरणात शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कृषिपंप वीजवाहिन्या अतिभारित (ओव्हरलोड) होत असते, अशा तक्रारी मिळत असल्याने वीजवाहिन्यांचे जाळे सक्षम करणे, रोहित्रांची संख्या व क्षमता वाढविण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. “राज्यातील किती आणि कोणत्या रोहित्रांना दिवसा आठ तास वीज पुरवठा करता येत नाही, याचा शोध घ्यावा व त्यांच्या सक्षमीकरणासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा.

इतर राज्यांच्या तुलनेत औद्योगिक ग्राहकांचे वीजदर जास्त आहे. वीजदरांमुळे राज्यातील उद्योगांच्या वाढीस अडथळा निर्माण झाला आहे. उद्योगांचे वीजदर कमी करणे गरजेचे आहे. त्यामुळे वीजदर किमान एक रुपया प्रतियुनिटने कमी करण्यासाठी प्रयत्न करावे. सोबतच घरगुती व वाणिज्यिक दरही कमी करण्यासाठी नियोजन करा.” असे निर्देश राऊत यांनी दिले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

5 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

7 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago