तलाठ्यांच्या फेरफारांचे मंडलनिहाय दैनंदिन संकलन करण्याचे आदेश

शेतजमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारानंतर विहित वेळेत तलाठी आणि मंडलाधिकारी यांनी फेरफार नोंदीची प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असताना यामध्ये मोठा विलंब केला जात असल्याच्या वाढत्या तक्रारी पाहता व वेळीच फेरफार नोंद न झाल्याने निर्माण होणारे वाद,तंटे लक्षात घेत आता  मंडलनिहाय दैनंदिन किती प्रलंबित फेर आहेत, याची माहिती संकलित  केले जावेत असे आदेश औरंगाबादचे  विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत.

               मराठवाडा विभागात सात-बारा ऑनलाईनचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. मात्र तरीही तलाठ्यांच्या पातळीवर सात-बारामध्ये फेर करण्यास विलंब होत आहेत. याच्या तक्रारी थेट विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांपर्यंत जात आहेत. विभागातील सर्व जिल्ह्यांतील हा प्रकार त्यांच्यापर्यंत येऊ लागला आहे. त्यामुळे केंद्रेकरांनी महसूल उपायुक्त पराग सोमण यांना प्रत्येक जिल्ह्यात किती फेरफारची प्रकरणे प्रलंबित आहेत, याची माहिती संकलित करण्याचे सांगितले आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात मे २०२० पासून आतापर्यंत २० हजार जमिनींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार झालेत. त्या व्यवहारानंतर सात-बारातून जुनी नावे वगळणे, नवीन नावांचा फेर घेणे गरजेचे असते. किती व्यवहारातील फेरफार तलाठ्यांच्या पातळीवर झालेला नाही, फेर न घेतल्यामुळे जमिनींच्या मालकीवरून कुठे काही वाद सुरू झाले आहेत काय, याची माहिती या आदेशामुळे विभागीय पातळीवर संकलित होणार आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

22 hours ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

4 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago