नवी दिल्ली – सर्व साधारणपणे आपण गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर त्याची आपल्याला दोन ते तीन दिवसांनंतर डिलिव्हरी होते. कधी कधी तर बुकिंग केल्यानंतर आठवडाभर सिलेंडर येत नाही. त्यातच ज्यांच्याकडे फक्त एकच सिलेंडर आहे त्यांचे तर जास्तच हाल होतात. यामुळे आपली चीडचीड होते आणि मनस्तापही सहन करावा लागतो, पण ही वेळ आता ग्राहकांवर येणार नाही. कारण बुकिंग केल्यानंतर त्याच दिवशी अवघ्या 30 मिनिटांच्या आत गॅस सिलेंडर तुमच्या दारात पोहोचणार आहे.
ग्राहकांना सिलेंडर वेळेत न मिळणे या समस्येवर एक प्रभावी प्लान इंडियन ऑईल कॉर्पोरेशन कंपनीने तयार केला आहे. सध्या राज्यातील फक्त एकाच शहरात या प्रक्रियेला सुरुवात होणार असून नंतर या योजनेचा विस्तार होणार आहे. या योजनेवर काम सुरू असून फेब्रुवारीच्या एक तारखेपासूनच या योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल, असा दावा इंडियन ऑईलने केला आहे.
जगभरात आयओसीचे 28 कोटी ग्राहक आहेत. यामध्ये 14 कोटी ग्राहक इंडियन ऑइल कंपनीचे सिलेंडर वापरतात. सिलेंडर संपल्यानंतर ग्राहकांनी बुक केल्यानंतर, तो मिळेपर्यंत अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकवेळा पाठपुरावा करावा लागतो. बरेच दिवस वाट पाहावी लागते, या सर्व समस्यांवर उपाय म्हणून आयओसीने या योजनेची अंमलबजावणी करायचे ठरवले आहे.
अॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…