एफआरपीची थकीत रक्कम न दिल्यास ‘विठ्ठल’चा बॉयलर प्रदीपन समारंभ हाणून पाडणार

एफआरपीची थकीत रक्कम न दिल्यास ‘विठ्ठल’चा बॉयलर प्रदीपन समारंभ हाणून पाडणार

जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांचा इशारा

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने गेल्या दोन वर्षापूर्वी ची प्रलंबित ऊसाची बिले कायदा पायदळी तुडवुन अद्याप शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली नाहीत. तरी येत्या 8 तारखेला विठठ्ल कारखान्याचा अग्नीप्रदिपन कार्यक्रम होणार आहे तो होऊ देणार नसल्याचे प्रभाकर देशमुख यांनी सांगीतले.
  तसेच ऊस वाहतूकदारांची भाडे व कामगारांच्या संपूर्ण पगारी संबंधितांच्या खात्यावर जमा कराव्यात या मागणीसाठी व या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तहसील कार्यालय समोर गेल्या तेरा दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. मा जिल्हाधिकारी शंभर कर साहेब व मा तहसीलदार डॉ वैशाली वाघमारे यांनी आंदोलनाची  दखल घेऊन सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालया मध्ये एक तारखेला बैठक लावली त्यामध्ये  तहसीलदार डॉ वैशाली वाघमारे यांनी बैठकीत विठ्ठल कारखान्याचा विषय जिल्हाधिकारी यांचे समोर घेतला नव्हता पहिल्या निवेदनात दिलेल्या मागणीप्रमाणे गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने सुद्धा ऊस उत्पादक शेतकरी ऊस वातुक भाडेकरी व कामगार यांच्यावर देखील सातत्याने दोन वर्षापासून हा अन्याय सुरु आहे विठ्ठल कारखान्या कडे दोन वर्षापूर्वीचे ऊस उत्पादकांचे 177 रुपये म्हणजे पाच कोटी 80 लाख रुपये ऊस उत्पादकांची येणे बाकी आहे त्यांनीसुद्धा ऊस नियंत्रण कायदा पायदळी तुडवून कष्टकरी शेतकऱ्या वरती सातत्याने अन्यायकरीत आहेत मा.साखर आयुक्त मा जिल्हाधिकारी व मा तहसीलदार यांनी विठ्ठल कारखान्यावर आर आर सी ची कारवाई करावी कारण इतर कारखान्या बरोबर विठ्ठल कारखान्यावर आर आर सी ची कारवाई करण्याचे निवेदन माजिल्हाधिकारी आणि मा तहसीलदार यांना यापूर्वी दिलेले आहे त्यामुळे  तहसीलदार डॉक्टर वैशाली वाघमारे यांनी स्वतः यात लक्ष घालून  आपली कर्तव्यद्क्षता पार पाडून शेतकऱ्यांना व कामगारांना न्याय द्यावा अन्यथा विठ्ठल कारखान्याच्या अग्निप्रदिपन होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे.
यावेळी ‘जनहित’ चे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब ताड, श्रीकांत नलवडे, संपर्कप्रमुख ज्ञानेश्वर भोसले, सचिन आटकळे, सुभाष शेंडगे, बाळासाहेब सपाटे, संतोष चव्हाण, पंढरपूर शहराध्यक्ष मारुती भुसनर, रोपळे येथील औदुंबर गायकवाड, कुलदीप कदम, आबा गुंड, अमित व्यवहारे, तानाजी गायकवाड, सर्जेराव पाटोळे, सुग्रीव माने, सचिन भुसे, सुखदेव घोडके, विजय शेळके, विठ्ठल भुसे, भजनदास पवार तसेच असंख्य शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

6 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

1 week ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

3 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

3 weeks ago