पुण्यात सलग चौथ्या दिवशी हत्येचा थरार दिसून आला आहे. हा सर्व थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेनं पुण्यात खळबळ उडाली आहे. मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन दोन तरुणांनी एका महिलेची भररस्त्यात दिवसाढवळ्या हत्या केली आहे. दोन दिवसांपूर्वीच एका व्यक्तीने परिचय असलेल्या एका तरुणावर गोळीबार केला आणि स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. ज्या तरुणावर गोळीबार झाला त्याची प्रकृती गंभीर आहे. आज घडलेल्या घटनेत हत्या झालेल्या महिलेचं नाव वर्षा थोरात असं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अब्दुल सय्यद आणि गौरव चौगुले या दोघांना अटक केली आहे. वर्षा या महिलेला दारुचे व्यसन होते. अब्दुल सय्यद हा अंडा भूर्जीचा व्यवसाय करतो. १० ते १५ दिवसांपूर्वी अब्दुल याचा मोबाईल चोरीला गेला होता. हा मोबाईल मृत महिलेनं चोरल्याचा त्याला संशय आला. या संशयावरून त्याने आणि गौरव यांनी त्या महिलेकडे मोबाईलबाबत विचारणा केली. त्यावरुन त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा त्यांनी वर्षा या महिलेच्या डोक्यात काठीने मारहाण केली. घाव डोक्यात बसल्याने महिला खाली कोसळली. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. फरासखाना पोलिसांना घटनेची माहिती मिळताच धाव घेऊन त्यांनी या दोन जणांना अटक केली आहे.
अॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…