वर्धा जिल्हा चांगलाच हादरला आहे. पारडी गावातील घटना कारंजा तालुक्यातील पारडी गाव सध्या सुन्न झालंय. कारण गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) तालुक्यातील पारडी येथील प्रेमीयुगुलाने काही दिवसांपूर्वी पलायन केलं होतं.
दाखल केली होती. त्या दोघांचेही मृतदेह शेतातील विहिरीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पारडी येथील रहिवासी हर्षल बाबा वाघाडे (२२) याने गावातीलच एका १७ वर्षीय मुलीला २२ जानेवारीला फुस लावून पळवून नेलं होतं. मुलीच्या कुटुंबीयांनी एक दिवस सर्वत्र शोध घेतला. पण, तिचा काहीच पत्ता लागला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांनी २३ जानेवारीला तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या दिवशीपासून तळेगाव पोलीस या दोघांचाही शोध घेत होते.
पारडी येथील गणेश रंगारी यांच्या शेतातील विहिरीमध्ये दोन मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले होते. याची माहिती पारडीच्या पोलीस पाटलांना मिळाली. त्यांनी लागलीच तळेगाव पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळावर जाऊन मृतदेह विहिरी बाहेर काढले.
विहिरीतून हे दोन्हीही मृतदेह काढण्यात आले. त्यानंतर त्यांची ओळख पटविण्यासाठी बेपत्ता असलेल्या प्रेमीयुगुलाची चौकशी केली. तेव्हा बेपत्ता असलेल्या मुला-मुलीची ओळख पटली. दोघांनी ओढणीनं पाय बांधून विहिरीत उडी घेतल्याचं निदर्शनास आलं.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…