सतत होणाऱ्या वादामुळे तरुणीने प्रेमसंबंध तोडले. तसेच तिच्या आईने देखील त्यांच्या नात्याला विरोध केला. या रागातून तरुणीच्या प्रियकराने प्रेयसीच्या आईचा बेल्टने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना पाषाण परिसरातील एका उच्चभ्रू सोसायतीत घडली. वर्षा क्षिरसागर (५८) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मृण्मयी जगदीश क्षीरसागर या तरुणीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यावरून शिवांशू दाचाराम गुप्ता (२३, रा. मोहननगर, येरवडा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १८ जानेवारीला घडली. मात्र, सुरूवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यांनतर खुनाचा उलगडा झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी आणि आरोपीचे गेल्या सात महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. मात्र त्यांच्यात विविध कारणांवरून सातत्याने वाद होत होते. त्यामुळे तक्रारदार तरुणीने यापुढे प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला होता.
तरुणीच्या आईने देखील या दोघांच्या प्रेमसंबंधाला विरोध केला होता. तसेच प्रेमसंबंध ठेवायचे नाही, असे बजावले होते. त्याचा आरोपीला राग आला होता. घटनेच्या दिवशी तक्रार करून घरी नसताना आरोपी त्यांच्या घरी आला. त्याच घरातील कुत्र्याला बांधण्याकरीता असलेल्या बेल्टने तरुणीच्या आईचा गळा आवळून त्यांना जीवे ठार मारले. त्यानंतर त्यांचा मृतदेह बेडरुममध्ये ठेवला आणि आरोपी तेथून निघून गेला.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…