राजबाग-काणकोण बीचवर पतीकडून पत्नीचा खून करण्यात आला असून, संशय येऊ नये म्हणून पतीने अपघाताचा बनाव केला.कुंकळ्ळी पोलिसांनी याप्रकरणी संशयित पतीला अटक केली आहे. गौरव कटियार (29, रा. कोलवा, मूळ लखनऊ) असे अटक करण्यात आलेल्या संशयित पतीचे नाव आहे. तर, दीक्षा गंगवार (वय 27, लखनऊ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव पत्नी दीक्षासह राजबाग-काणकोण येथील काब-दी-रामजवळ फिरण्यासाठी म्हणून गेले होते. गौरव पत्नीला खडकाळ भागात घेऊन गेला आणि त्यानंतर झालेल्या वादातून पत्नीला समुद्राच्या पाण्यात बुडवले. पण, पत्नी आईस्क्रीम खरेदी करण्यासाठी गेली असता अपघाताने पाण्यात बुडाली, असे संशयित पती गौरवने पोलिसांना सांगितले.
या घटनेसंबधित समोर आलेल्या व्हिडिओत संशयित पती पत्नीचा मृतदेह बाहेर काढताना दिसत आहे. संशयिताने पत्नीचा खरच मृत्यू झाला आहे की नाही हे देखील पाण्यात जाऊन तपासले. स्थानिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी संशयित गौरवची चौकशी केली असता त्याची उत्तरे संशयास्पद आढळून आली, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांच्या सखोल चौकशीनंतर संशयित गौरवने पत्नीच्या खूनाची कबुली दिली आहे.
अॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…