संक्रांतीचा सण येतोय, हा सण देशभर साजरा केला जातो. तेलंगणामध्येही संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तिथे संक्रांतीनिमित्त नवीन कपड्यांसाठी एका महिलेने पतीकडे हट्ट धरला. पतीने आधी नव्या कपड्यांसाठी नकार दिला आणि यामुळे नाराज झालेल्या महिलेने धक्कादायक पाऊल उचललं. तिने आपल्या दोन मुलींची गळा दाबून हत्या केली आणि गळफास लावून जीव दिला. या भयंकर घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.
कामावर गेलेला पती पत्नी व मुलींसाठी नवीन कपडे घेऊन घरी परतला आणि घरात पत्नी आणि मुलींचे मृतदेह पाहून त्याला धक्का बसला. तो सुपरवायझर म्हणून काम करतो आणि त्याला पाच महिन्यांपासून पगार मिळाला नव्हता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने महिलेने हे जीवघेणं पाऊल उचललंय, असं कळतंय. पैशांवरूनच पती-पत्नीमध्ये भांडण झालं होतं. पत्नीला मकर संक्रांतीच्या सणाला कपडे खरेदी करायचे होते; पण नवर्याकडे पैसे नव्हते. त्याने तिला कपडे नंतर घेऊन देण्याचं आश्वासन दिलं होतं. तरीही तिने टोकाचं पाऊल उचललं. पोलिसांनी सर्व मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले आहेत.
नगरकुर्नूल जिल्ह्याच्या नल्लामाला भागातल्या रामपूर पेंटा गावात ही धक्कादायक घटना घडली. या गावातला रहिवासी असलेल्या चिन्ना बयानाची दोन लग्नं झाली आहेत. त्याला दोन्ही पत्नींपासून 8 मुलं होती. तो कृष्णा नदीजवळच्या 1 बेस कॅम्पमध्ये सुपरवायझर म्हणून काम करतो. त्याची एक पत्नी चिन्नागम्मा संक्रांतीच्या सणासाठी आपल्या मुली यादम्मा आणि बायम्मा यांच्यासाठी नवीन कपडे घेण्याचा हट्ट पतीकडे करत होती. चिन्ना बयानाने त्याला त्याची कठीण परिस्थिती सांगितली; पण तिने ऐकलं नाही. नंतर त्याने पत्नीला नवीन कपडे घेऊन येईन, असं वचन दिलं आणि मन्नानूर इथं कामासाठी निघून गेला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चिन्नागम्माने रागाच्या भरात आपल्या दोन्ही मुली यादम्मा आणि बायम्मा यांचा गळा दाबून खून केला. नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. पती घरी आला असता घरात पत्नी व मुलींचे मृतदेह पाहून त्याला धक्काच बसला. त्याने मन्नानूर इथून कपडे खरेदी केले होते आणि तो घरी आला होता; पण घरात मात्र या तिघींचे मृतदेह दिसले. या घटनेने एकच खळबळ उडाली. घटना उघडकीस आल्यावर घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली. घरातलं हे भयंकर दृश्य पाहणारेही सुन्न झाले. माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि पुढचा तपास सुरू केला.
अॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…