ताज्याघडामोडी

लग्नात रंगला हत्येचा थरार; गरम जेवण न मिळाल्यानं आचाऱ्याच्या अंगावर ओतलं तेलं

उत्तर प्रदेशमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लग्नात आलेल्या एका व्यक्तीला गरम जेवण न मिळाल्यामुळे जेवण बनवणाऱ्या आचाऱ्यावर उकळते तेल आतेले आहे. तेल ओतल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. या घटनेने लग्नसमारंभात एकच खळबळ माजली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येतोय. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,उत्तर प्रदेशातील मूसघाण पोलीस ठाण्याच्या परिसरात पन्नालाल यांच्या मुलीचे बुधवार(ता.२९) रोजी लग्न होते. लग्न कार्यादरम्यान पाहुणे मंडळी जेवणासाठी गेले होते. दरम्यान नवऱ्या मुलाचे काका इंद्रपालही जेवणासाठी काही नातेवाईकांसोबत जेवायला गेले.त्यावेळी तिथं असलेला आचारी राजेश हा चपाती बनवत होता. त्याने एक चपाती भाजली आणि तिथं उपस्थित असलेल्या पाहुण्यांना दिली. त्यावर ही चपाती तेथील एका काकांना थंड वाटली. त्यामुळे चपाती थंड का आहे असं त्याने आचाऱ्याला विचारलं…. परंतू आरोपी काकांना आचाऱ्याने गरम चपाती देण्यासाठी काही वेळ थांबण्यास सांगितले असता आरोपीला राग आला.

काका आणि आचाऱ्यामध्ये यावरून वाद सुरु झाले. हा वाद इतका विकोला गेला की काकांनी रागात येऊन त्याच्या समोर असलेल्या गरम कढईतले उकळते तेल आचाऱ्याच्या अंगावर फेकले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

7 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

1 week ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

3 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

3 weeks ago