जिल्ह्यात महाड तालुक्यातील नडगाव हद्दीमध्ये अरुण नगर या सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये रहिवाशी असलेल्या इसमाचा स्वतःच्या फ्लॅटमध्येच मृतदेह सापडला आहे. ऐन दिवाळीच्या सणांमध्ये सर्व शेजारी आणि मयत इसमाचे नातेवाईक घरात नसल्यामुळे ही बाब लवकर कोणाच्याही लक्षात आली नाही. परंतु काल सायंकाळी सर्वत्र दुर्गंधी का येत आहे असा प्रश्न निर्माण झाला.
यामुळे तपास केला असता अरुण नगर सोसायटी येथील रहिवाशी जयदीप बळीराम येरूनकर यांचा मृत्यूदेह तीन दिवसापासून त्यांच्या खोलीमध्ये आढळला. आजूबाजूच्या रहिवाशांनी ही गोष्ट पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. जयदीप येरुनकर यांना पूर्वीपासून मधुमेहाचा खूप त्रास होता. तसेच मधुमेहाचा त्रास अधिक वाढल्यामुळे त्यांना चक्कर आली आणि त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
तसेच जयदीप येरूनकर आणि त्यांची पत्नी यांचे देखील क्षुल्लक कारणावरून वारंवार भांडण होत असत. असे देखील शेजाऱ्यांनी सांगितले आहे. दिवाळी सणामध्ये जयदीप यांच्या पत्नी त्यांना एकटे सोडून गेल्या असल्यामुळे त्यांचा मधुमेहाचा त्रास वाढला आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झाला, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे या मृत्यूची आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून या संपूर्ण घटनेचा अधिक तपास अतिरिक्त प्रभारी पोलीस अधिकारी सुर्वे आणि पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अंबर्गे हे करीत आहेत.
अॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…