लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. प्रत्येक व्यक्ती या दिवसाची आतुरतेनं वाट पाहात असतो. मात्र, काही वेळा लग्नाच्या अशा काही घटना समोर येतात, ज्या हादरवून टाकतात. अशीच एक घटना बीडमधून समोर आली आहे. बालविवाहाचा धक्कादायक प्रकार बीडच्या आष्टी तालुक्यात उघडकीस आला आहे.
यात 11 वर्षांची नवरी अन् 13 वर्षांचा नवरदेव होता. या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील बालविवाहाचं वास्तव समोर आलं आहे, जे चिंता करायला लावणारं आहे. बालविवाह रोखण्यासाठी सरकारने कडक कायदे केले आहेत. मात्र, कायद्याला झुगारून बालविवाह लावून देत असल्याच्या घटना समोर येत आहे.
आष्टी शहरापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावातील ही घटना आहे. 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान आईने 11 वर्षांच्या मुलीचा विवाह करमाळा तालुक्यातील देवळाली येथील 13 वर्षांच्या मुलासोबत हळदी समारंभात लावून दिला.
या प्रकरणात ग्रामसेवक बापू कुंडलिक नेटके यांच्या फि्यादीवरून सुशीला एकनाथ पवार, गौतम रघुनाथ काळे, माया गौतम काळे, राधा गौतम काळे यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुलीच्या आईने विवाह लावून दिल्यानंतर बापाने या प्रकाराला वाचा फोडली.
अॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…