विविध राजकीय नेते आणि खासकरुन विरोधकांवर विविध घोटाळ्यांचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या हे नेहमी चर्चेत असतात. कधी ते त्यांनी केलेल्या आरोपांमुळे तर कधी त्यांच्या आरोपांचे पुढे काय झाले यामुळे चर्चा झडत असते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी विविध आरोप केले. आणि आता हेच मुश्रीफ भाजप-शिंदे सरकारमध्ये मंत्री झाले आहेत. त्यामुळे आता सोमय्या काय करणार या प्रश्नावर सोशल मिडियात अनेक पोस्ट व्हायरल झाला. त्यातच आता खुद्द सोमय्यांचीच फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे.
माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई सायबर सेलकडे एक तक्रार केली आहे. त्यात त्यांनी नमूद केले आहे की, तीन तरुणांनी वैद्यकीय मदतीच्या नावाखाली त्यांची ३६०० रुपयांची फसवणूक केली आहे. निखील गायकवाड, अक्षय गायकवाड आणि सौरभ निकम अशी या तीन तरुणांची नावे आहेत. या तिन्ही तरुणांनी सोमय्यांकडे वैद्यकीय कारणासाठी आर्थिक मदत मागितली होती. त्यानंतर सोमय्या यांनी या तरुणांना ३६०० रुपयांची मदत केली. मात्र, या मदतीबद्दल सोमय्या यांनी केईएम हॉस्पिटलला विचारणा केली. मात्र, या तीन तरुणांनी फसवणूक केल्याचे समोर आले. त्यानंतर सोमय्या यांनी या तरुणांविरुद्ध सायबर सेलकडे तक्रार केली.
अॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…