अभिजीत पाटील यांचेकडून ४लाख मे.टन गाळपाचे उद्दीष्ट
पंढरपूर प्रतिनिधी/-
सांगोला तालुक्यातील धाराशिव साखर कारखाना युनिट नंबर ४ची आगामी सन २०२३ते २०२४या सालातील गळीत हंगामाची तयारी सुरू झाली आहे. यासाठी सोमवारी या कारखान्याचे मिल रोलर पूजन सहकार शिरोमणी कारखान्याचे मा.संचालक श्री.दिपक पवार व त्याच्या सुविद्य पत्नी सौ.मधुराताई यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी चेअरमन अभिजीत पाटील यांनी याआगामी हंगामात कमीत कमी चार लाख गाळप करण्याचे उद्दीष्ट ठेवले असल्याचे जाहीर केले.यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील,जनरल मॅनेजर रवींद्र साळुंखे, चिफ इंजिनिअर श्री. सगरे, मुख्य शेतकी अधिकारी जमीर काझी, चीफ केमिस्ट श्री.आवळे ,चीफ अकाऊंट अजित घोडे, उप शेती अधिकारी सुनिल मासाळ, तसेच उपखाते प्रमुख सर्व कर्मचारी, कामगार वर्ग उपस्थित होते.
हा कारखाना बारा वर्ष बंद होता. तो अभिजीत पाटील यांनी आपल्या धाराशिव युनिट नंबर ४म्हणून आपल्याकडे घेतला. अवघ्या ३५दिवसात बंद अवस्थेत असलेला हा कारखाना सुरू करून मागील दोन वर्ष गाळप केले आहे. हा तिसरा गाळप हंगाम सुरू करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. यामुळे सांगोला तालुक्यासह इतर भागातील ऊस गाळपचा मोठा प्रश्न मिटणार आहे.
अॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…