उत्तरप्रदेश राज्यातील महिला पीसीएस अधिकारी ज्योती मौर्या या सध्या सोशल माडियावर चांगल्याच चर्चेत आहेत. आपल्या पतीची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.हे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एका महिलेला नोकरी मिळाल्यानंतर ती तिच्या बेरोजगार पतीला सोडून पळून गेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना झारखंड राज्यातील असून कल्पना असे या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कन्हाई पंडित यांचा विवाह 14 वर्षांपूर्वी कल्पना देवीसोबत हिंदू रितीरिवाजांनुसार झाला होता. अशिक्षित पतीने पत्नीला जमशेदपूरमध्ये ठेवले आणि तिला एएनएमचा अभ्यास करून दिला.
अनेक खासगी हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर कल्पनाला नोकरीही लागली, पण नोकरी मिळताच ती एका व्यक्तीच्या प्रेमात पडली. पतीने केला हा आरोप – कल्पना या महिलेचा पती कन्हाई याने आरोप केला आहे की, पत्नीला शिकवण्यासाठी पैसे काढल्याने त्या कर्जामुळे तो पैसे कमाईसाठी गुजरातला गेला होता. मात्र, परत आल्यावर त्याला बायकोची वागणूक फारशी चांगली वाटली नाही. तिचे पतीसोबत भांडण झाले आणि नंतर ती दुसऱ्या मुलासोबत पळून गेली.
यानंतर पतीने पत्नीच्या शोधात पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला, पण तेथेही त्याच्या पदरी निराशाच पडली. गुरुवारी त्याला एसडीपीओ कार्यालयातून फोन आला की त्याने सर्व माहिती घेऊन कार्यालय गाठावे. कार्यालयात पोहोचल्यावर एसडीपीओने प्राथमिक चौकशी केली. यानंतर गावातील काही साक्षीदारांसह त्याला पुन्हा कार्यालयात येण्यास सांगितले.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…