राज्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि सर्वत्र शेतीचे नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. अशात आता कडक उन्हाच्या झळा नागरिक सहन करत आहेत. या सगळ्यात मात्र पुढचे ३ दिवस राज्यासाठी महत्त्वाचे असणारे आहेत. कारण, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, यावेळी वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी आणि धान्याची योग्य त्या ठिकाणी साठवणूक करावी, अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत. यंदा झालेल्या अवकाळी पावसामुळे आधीच शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशात आता पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
दरम्यान, यंदा मान्सून उशिरा दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशा खात्याकडून वर्तवण्यात आला होता. मात्र, उशिराने दाखल होणारा पाऊस १९ मे रोजी दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात, अंदमान निकोबार बेटांवर आणि अंदमानच्या समुद्रात दाखल झाला. त्यामुळे यंदा वेळेतच पाऊस होईल असाही अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
एकीकडे राज्यात उन्हाचा पारा वाढत असताना दुसरीकडे काल नंदुरबारमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. अतिवृष्टी झाल्यामुळे इथं ३५ हून अधिक संसार उध्वस्त झाले. नदी-नाल्यांना पूर आले तर अनेक झाडं उन्मळून पडल्याचं चित्र पाहायला मिळालं.
अॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…