एकाच कुटुंबातील ४ जणांची त्यांच्याच घरात हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील बांदा येथे रविवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. धारदार शस्त्राने या चौघांची हत्या करण्यात आली असून हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. मृतांमध्ये पती-पत्नी, एक महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं. पुरावे गोळा करण्यासाठी श्वान आणि फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली. सध्या पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
प्रकरण बांदाच्या गिरवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडोखर गावातील आहे. जिथे १५ मार्चच्या रात्री अज्ञातांनी एकाच कुटुंबातील चार जणांची धारदार शस्त्राने हत्या केली. मृतांमध्ये चुन्नू (७०), कैलसिया (६५), तीजानिया (७६) आणि प्रियांशू (८ वर्षे) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सर्वजण घरी होते त्याच दरम्यान ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांना घटनास्थळी वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह आढळून आले, त्यावरुन असा अंदाज बाधण्यात येत आहे की आरोपींना ज्या ठिकाणी जो सापडला त्याची तिथेच हत्या केली. रविवारी सकाळी घराचा दरवाजा उघडला असता शेजारच्यांना धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
अॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…