राजस्थानमधील जोधपूर येथे एका विवाहित महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला आहे. राजीव गांधी पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी या महिलेचे पतीसोबत भांडण झाले आणि सायंकाळी उशिरा तिचा मृतदेह घरातच गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. राजीव गांधी नगर भागातील पठाणकोट भागात राहणाऱ्या महिलेचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. आता ती संशयास्पद परिस्थितीत मृत आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
सकाळी या पती-पत्नीमध्ये वाद झाला होता आणि सायंकाळी महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. या भांडणात पती जखमी झाला होता. त्यानंतर त्याने राजीव गांधी नगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रारही नोंदवली होती.
एसीपी प्रतापनगर प्रेम धांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचं माहेर जयपूर येथे आहे. त्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. माहेरहून नातेवाईक आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विवाहितेने लव्ह मॅरेज केले होते. रविवारी रात्री या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाची पाहणी केली. रात्री उशिरा मृतदेह मथुरादास माथूर रुग्णालयाच्या शवागारात हलवण्यात आला.
अॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…