ताज्याघडामोडी

एकच विनंती आहे, मी आरोपी नाही… जितेंद्र आव्हाडांच्या माजी अंगरक्षकाने आयुष्य संपवलं

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या माजी अंगरक्षकाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनंत करमुसे मारहाण प्रकरणावेळी आव्हाडांचे बॉडीगार्ड असलेल्या मुंबई सुरक्षा दलातील हवालदार वैभव कदम यांनी आयुष्याची अखेर केली. रेल्वेखाली उडी घेत वैभव कदमांनी मृत्यूला कवटाळलं. करमुसे प्रकरणात चौकशीसाठी वारंवार बोलावून मानसिक त्रास दिला जात असल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप आहे. ‘पोलीस आणि मीडियाला एकच विनंती आहे, मी आरोपी नाही’ असे व्हॉट्सअप स्टेटस ठेवत कदम यांनी जीवनयात्रा संपवली.

जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातील आक्षेपार्ह पोस्ट अनंत करमुसे यांनी व्हायरल केल्याचा आरोप होता. या प्रकरणामुळे काही पोलीस अंगरक्षकांसह खासगी कार्यकर्त्यांनी करमुसे यांना आव्हाड यांच्या ‘नाद’ बंगल्यावर आणल्याचा दावा केला जात होता. तिथे जितेंद्र आव्हाड यांच्यासमोरच फायबरच्या काठीसह लोखंडी रॉडने जबर मारहाण केली गेली असल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता. ५ एप्रिल २०२० रोजी रात्री ११.५० ते ६ एप्रिल सकाळी ६.२२ वाजताच्या दरम्यान हा प्रकार घडल्या दावा होता. या प्रकरणी ६ एप्रिल रोजी करमुसे यांच्या तक्रारीनंतर वर्तकनगर पेालीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर यामध्ये मुंबई सुरक्षा दलातील हवालदार वैभव कदम, सुरेश जनाठे तसेच ठाणे मुख्यालयातील पोलीस शिपाई सागर मोरे हे तीन पोलीस कर्मचारी तसेच अभिजित पवार, समीर पवार, हेमंत वाणी, सूरज यादव, ज्ञानोबा वाघमारे, दिलीप यादव या खासगी कार्यकर्त्यांसह १२ जणांना अटक झाली होती. यापैकी मुंबई सुरक्षा दलातील हवालदार वैभव कदम यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे.

वैभव कदम हे तळोजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहत असल्याचे समोर येत आहे. करमुसे प्रकरणात चौकशीसाठी वारंवार बोलावून मानसिक त्रास दिला जात असल्यामुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

वैभव कदम गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तणावाखाली असल्याचे बोलले जाते. त्यांची मानसिक स्थिती कशी होती हे त्यांनी ठेवलेल्या फेसबुक आणि व्हॉट्सअप स्टेटसवरुन समोर आलंय. त्यांनी ठेवलेल्या शेवटच्या स्टेटसमध्ये त्यांनी लिहिलंय की ‘पोलीस आणि मीडियाला माझी एकच विनंती आहे मी आरोपी नाही आहे’ त्यामुळे प्रचंड तणावाखाली त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा सुरू आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

17 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

6 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago