लग्नकार्यात वेगवेगळ्या घटना घडत असतात. भांडण, मस्ती, मज्जा, रुसवे-फुगवे सगळं काही लग्नात असतं. पण एक विचित्र प्रकरण एका लग्नासंबंधीत समोर आलं आहे, ज्याबद्दल ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.
खरंतर या प्रकरणात नववधूने तिच्या नवऱ्याचा आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात मोठा गेम प्लान केला. ही घटना राजस्थानमधील बारनच्या शहााबाद येथील आहे. येथे एक नववधू आपल्या नवऱ्याला आणि त्याच्या घरच्यांना चकमा देऊन आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. एवढंच काय तर नववधू रोख रक्कम आणि दागिने चोरुन पळाली.
पोलिसांनी रोख रक्कम आणि दागिने चोरल्याप्रकरणी प्रियकरासह पळून गेलेल्या नववधूला आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि दागिनेही पोलिसांनी जप्त केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेने प्रियकरासह मिळून तिच्या सासरच्या लोकांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या, त्यानंतर घरातील मौल्यवान ऐवज घेऊन पळ काढला.
आरोपींना अटक केल्यानंतर पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. 2 मार्च रोजी पीडित पुरणचंद किराड यांनी शहााबाद पोलिस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली होती. ज्यामध्ये सांगितले की, त्यांची सून उर्मिला, मुकेश गुर्जर आणि दिलीप यांच्यासोबत पळून गेली, शिवाय तिने घरातील दागिने चोरले. या दागिन्यांमध्ये मंगळसूत्र, चांदीचे 3 जोडे पायघोळ, सोन्याचा हार, सोन्याच्या बांगड्या, सोन्याचे कानातले, दोन सोन्याच्या अंगठ्या आणि 50 हजार रुपये चोरीला गेले होते. त्यानंतर पोलिसांनी या आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर आरोपी पकडले देखील गेले. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…