शेतातला हरभरा काढण्याच्या गडबडीत घात झाला, पदर अडकून महिला मळणी यंत्रात ओढली गेली अन्…

शेतकरी एकदा आपल्या शेतामध्ये काम करायला लागला की तो तहानभूक विसरुन काम करतो. आपल्या शेतात उगवलेल्या पीकाची लवकरात लवकर कापणी करुन ते बाजारात कसं नेता येईल, यासाठी बळीराजाची कायमच धावपळ सुरु असते. त्यासाठी सर्व गोष्टी विसरुन, भान हरपून शेतकरी शेतात काम करत असतात. मात्र, या नादात अनावधनाने घडलेली एखादी चूक अनर्थ घडवण्यास आणि जीव घेण्यास कारणीभूत ठरू शकते. असाच काहीसा प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील शिंदी परिसरात घडला आहे.

शिंदी येथून जवळच असलेल्या तांदुळवाडी येथील एका चाळीस वर्षे महिलेचा पदर मळणी यंत्रात अडकल्याने त्या महिलेची जागीच मृत्यू झाला. मृतक महिलेचे नाव तारामती गुलाबराव बुंदे आहे . ही दुर्दैवी घटना २८ फेब्रुवारीला म्हणजे मंगळवारी दुपारी घडली . तांदुळ येथील गुलाबराव बुंधे यांच्याकडे तीन एकर शेती आहे. त्यांनी रब्बी हंगामात हरभरा पेरणी केली होती. त्यांच्या शेतातील हरभरा सोंगून झाला होता. गावातीलच परस राम बुंधे यांचे मळणी यंत्र बोलावून हरभरा काढणीला सुरुवात केली होती. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवल्याने बुंदे यांच्या शेतात हरभरा झटपट काढण्यासाठी लगबग सुरु होती.

त्यासाठी गुलाबराव आणि तारामती दोघेही पती-पत्नी शेतातील हरभरा जमा करून मळणी यंत्रात आणून टाकत होते. यावेळी हवामान काहीसे ढगाळ होते, तसेच वाराही वेगाने वाहत होता. याचा अंदाज तारामती बुंदे यांना आला नाही. हरभरा मळणी यंत्रात टाकण्याच्या नादात त्यांना अंगावरील कपड्यांचे भान राहिले नाही. त्यामुळे तारामती यांच्या साडीचा पदर मळणी यंत्रात अडकला आणि त्या आतमध्ये ओढल्या गेल्या. त्यांच्या बरगड्यांना जबर मार लागला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटना समजताच गावातील नागरिकांनी शेताकडे धाव घेतली. हा अपघात असल्याने गावातच प्रकरण तंटामुक्त समिती सदस्यांनी मिटवून समझोता केला. मृतकाच्या मागे पती एक मुलगा दोन विवाहित मुली असा परिवार आहे या घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र हळ हळ व्यक्त केली जात आहे. सध्या राज्याच्या अनेक भागांमध्ये शेतातील पिकांची कापणी सुरु असून हा माल बाजारपेठेत नेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. मात्र, या गडबडीत मळणी यंत्रामुळे अपघात होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात काम करताना स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

23 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

7 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago