ताज्याघडामोडी

पत्नीने दिला धोका; बदला घेण्यासाठी ज्याच्यासोबत पळाली त्याच्या बायकोला…

प्रेमप्रकरणातून अनेकदा विवाहित महिला किंवा पुरुष आपल्या जोडीदाराला सोडण्याचा निर्णय घेतात. पण, बिहारच्या खगरिया जिल्ह्यातील प्रेमप्रकरणाची जी घटना समोर आली आहे ती वाचून तुम्ही हैराण व्हाल. येथे पत्नीने आपल्या पतीला धोका दिला म्हणून पतीने बदला घेण्यासाठी त्या व्यक्तीच्या पत्नीशी लग्न केले ज्याच्यासोबत त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध होते.

खगरियाच्या चौथम ब्लॉकमधील हरदिया गावातील रहिवासी असलेल्या नीरजचे लग्न पसरहा गावात रुबी देवीसोबत २००९ मध्ये झाले होते. दोघांनाही चार मुलं होती. मात्र, रुबी देवीचे पसरहा गावात राहणाऱ्या मुकेशसोबत प्रेमसंबंध सुरू होते. मुकेशचंही लग्न झालेलं होतं. त्यालाही दोन मुलं होती. पण, या दोघांनी कसलाही विचार न करता फेब्रुवारी २०२२ मध्ये पळून जाऊन लग्न केलं. इतकंच नाही तर ते आपल्या दोन मुली आणि एका मुलाला सोबत घेऊन गावातून फरार झाले.

नीरजला त्याची पत्नी प्रियकर मुकेशसोबत पळून गेल्याचे समजताच नीरजने मुकेशविरुद्ध पसरहा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. नीरजने सांगितले की, अनेकवेळा गावात पंचायतही झाली पण मुकेश काही ऐकला नाही. मुकेश नीरजची बायको रुबीसोबत कधी या गावात तर कधी त्या गावात राहत होता. मग नीरजनेही बदला घेण्याचे ठरवलं. नीरजने आरोपी मुकेशच्या पत्नीसोबत पळून जाऊन लग्न केलं. विशेष म्हणजे या दोघांच्याही पत्नीचे नाव रुबी आहे.

मुकेशचा विवाह अमानी गावातील रुबी देवीसोबत झाला होता. मुकेश त्याच्या पहिल्या पत्नीला सोडून नीरजच्या पत्नीसोबत राहत होता. मुकेशचा बदला घेण्यासाठी नीरज मुकेशची पत्नी रुबीला फोन केला. नीरजने तिला सांगितलं की आपल्या नवऱ्याला समजावं. या संदर्भात नीरज आणि मुकेशची पत्नी रुबी यांच्यात अनेकदा फोनवर संवाद होऊ लागला. संवादाचे प्रेमात रुपांतर कधी झाले हे नीरज किंवा मुकेशची पत्नी रुबीला कळाले नाही. दोघांनाही आधाराची गरज होती. अशा परिस्थितीत दोघांनी १८ फेब्रुवारी २०२३ रोजी गावातून पळून जाऊन मंदिरात लग्न केले. या लग्नाची चर्चा आता अख्ख्या गावात होऊ लागली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

20 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

7 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago