अजितदादांना बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळतं हे मला माहीत नाही आणि मला बोलायची गरज नाही. अजितदादांनी बारामतीच्या बाहेर येऊन दुसऱ्यांचं बारसं करू नये आणि माझ्या फंद्यात पडू नये, नाहीतर पुण्यात येऊन मी त्यांचे बारा वाजवेन’, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अजित पवारांना दिला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्याकडे आता राहिलंय तरी काय?, राहिलेले १५-१६ आमदार देखील त्यांच्याकडे किती दिवस राहतील हे सांगता येत नाही. उद्धव ठाकरे यांना कोणतेही अस्तित्व नाही, त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं असंही नारायण राणे पुढे म्हणाले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले असून ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी सपत्नीक करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. आजपर्यंत माझ्या आयुष्यात जे जे चांगले प्रसंग आले ते केवळ तुझ्यामुळे आले आणि तुझा आशिर्वाद सदैव आमच्या सोबत राहू दे अशी प्रार्थना त्यांनी अंबाबाई चरणी केली. तसेच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मला फोन करून मंत्रीपदाची देखील ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. याबाबत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जे काही खासगी बोलणं झालं त्यामध्ये मला पडायचं नाही. काही जणांना सवय असते कायम तोंड घालण्याची. मात्र त्या दोघांमध्ये जे काही बोलणं झालं ते मला माहित नाही, असे नारायण राणे म्हणाले आहेत. तसेच मी कोणताही ज्योतिषी नाही, कोणता पक्ष कधी संपणार आहे हे सांगायला काम जनता करते आणि ज्यांचं काम पोषक आहे त्या पक्षाला जनता निवडून देते आणि बाकीचे इतिहास जमा होतात, असे ते यावेळी म्हणाले आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…
'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून दररोज १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती भारतीय…