उत्तर प्रदेशच्या पिलीभीतमध्ये एक नवरदेव फेशियल करायच्या बहाण्यानं फरार झाला. त्यामुळे कुटुंबाला नाचक्की सहन करावी लागली. अखेर नवरदेवाचा लहान भाऊ नवरीसोबत लग्न करेल, असा तोडगा काढण्यात आला. हा तोडगा मुलीकडच्यांनी मान्य केला. त्यामुळे अखेर विवाह सोहळा संपन्न झाला. मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. लहान भावानं लग्न केल्यानंतर त्याचा मोठा भाऊ घरी परतला आहे. फेशियलच्या बहाण्यानं पळून गेलेला मोठा भाऊ अखेर माघारी आला आहे.
बिलसंडातील मोहम्मदपूर गावात वास्तव्यास असलेल्या मावत तिवारी यांचा मोठा मुलगा शशांकचं लग्न बरेलीतील तरुणीशी ठरलं होतं. १ फेब्रुवारीला वरात निघणार होती. मात्र त्याआधी शशांक फेशियलसाठी पार्लरला गेला. तो बराच वेळ होऊनही परतला नाही. त्यामुळे कुटुंब चिंतेत होतं. शशांकला बराच वेळ शोधूनही त्याचा ठावठिकाणा सापडला नाही.
शशांकच्या कुटुंबीयांनी मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. शशांकचा लहान भाऊ विषर्भ लग्नाला तयार असल्याचं सांगण्यात आलं. सुदैवानं मुलीच्या कुटुंबीयांना आक्षेप नव्हता. शशांक अचानक पळून गेल्यानं विषर्भला होणाऱ्या वहिनीसोबत लग्न करावं लागलं. दरम्यान शशांकचं कुटुंब आणि पोलीस शशांकचा शोध घेत होते. पोलिसांनी शशांकच्या फोनचं लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला.
शशांक एका तरुणीशी सातत्यानं संपर्क साधत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी तिला चौकशीसाठी बोलावलं. सुरुवातीला तिनं काहीही बोलण्यास नकार दिला. मात्र कसून चौकशी करता तिनं शशांकसोबत कोर्ट मॅरेज केल्याचं सांगितलं. त्यानंतर तिनं काही कागदपत्रं पोलिसांना दाखवली. यानंतर शशांकच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आलं. ‘आम्ही मोठ्या मुलासोबतचे संबंध तोडले आहेत. त्यानं लग्न केलं. तो आता सज्ञान आहे. त्याला वाटेल ते तो करू शकतो,’ असं शशांकचे वडील म्हणाले.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…