ताज्याघडामोडी

महागड्या कर्जातून सर्वसामान्यांना दिलासा नाहीच; रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) पतधोरण समितीची बैठक नुकतीच पार पडली. देशातील केंद्रीय बँकेची पतधोरण बैठक सोमवार ६ फेब्रुवारी रोजी सुरु झाली असून नुकतेच बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी नवीन वर्षातील बँकेचे पहिले पतधोरण जाहीर केले. तीन दिवस चाललेल्या बैठकीतील निर्णयानुसार रिझर्व्ह बँकेने व्याजदरात (रेपो रेट) ०.२५ बेस पॉईंटने वाढ जाहीर केली असून यासह केंद्रीय बँकेचा व्याजदर ६.५% वर पोहोचला आहे.अशा परिस्थितीत वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य कर्जदारांना आज आणखी एक धक्का बसला आहे.

उल्लेखनीय आहे की मागील वार्षिक विक्रमी महागाईच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने रेपो दरात सलग सलग पाच वेळा वाढ केली. यासह रेपो दर ६.२५ टक्क्यांवर पोहोचला. तर यंदाही आरबीआयने दरवाढ कायम ठेवली असून रेपो रेटमध्ये २५ बेसिक पॉइंट्सची वाढ जाहीर केली. अशा स्थितीत रेपो दरात वाढ झाल्यानंतर बँका आणि वित्तीय संस्था देखील व्याजदरात सुधारणा करतील, ज्यामुळे गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्जे महाग होतील. त्याच वेळी, ज्या करदारांनी आधीच कर्ज घेतले आहे त्यांना महागड्या ईएमआयचा सामना करावा लागेल. सततच्या उच्च महागाई दरामुळे आरबीआयने रेपो दरवाढीचा निर्णय घेतला आहे. एमपीसीचे ६ पैकी चार सदस्य दरवाढीच्या बाजूने राहिले.

रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर करत शक्तिकांत दास म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्थेतील चढ-उतार आणि महागाईच्या आकडेवारीचा भारतीय अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहे. भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने वाढतेय पण जागतिक आव्हानानुसार निर्णय घ्यावे लागतील. आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, आर्थिक वर्ष २०२३ साठी भारताचा जीडीपी ७ टक्के अंदाजित करण्यात आला असून आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी महागाईचा दर ४ टक्क्यांच्या वर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँकेने महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या वर्षी रेपो दरात सलग पाच वेळा वाढ केली. मांगुळ एका वर्षात रेपो रेटमध्ये एकूण २.२५ बेसिस पॉइंट्सची वाढ झाली आहे. गेल्या वेळी डिसेंबर २०२२ मध्ये आरबीआयने व्याजदरात ०.३५ टक्क्यांनी वाढ केली आणि ६.२४ टक्के केला. रेपो दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांसाठी कर्ज आणि ईएमआय महाग झाले आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

26 mins ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

6 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago