ताज्याघडामोडी

मी पूर्ण जबाबदारीने सांगतेय… अदानी प्रकरणावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची पहिली प्रतिक्रिया

अदानी समूहाबाबतच्या कथित गैरव्यवहारांबाबतचा अहवाल अमेरिकास्थित हिंडेनबर्ग संस्थेने प्रसिद्ध केल्याने गेल्या काही दिवसांपासून एकच खळबळ उडाली आहे. Hindenburg Research नं अदानी उद्योग समूहावर बाजारातील व्यवहारांमध्ये गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवला आहे. हिंडेनबर्गचा अहवाल आल्यापासून अदानी उद्योग समूहाला एकूण 120 अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे. याचे पडसाद देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशतानही उमटले आहेत. संसदेत अदानी प्रकरणावरून मोठा गदारोळ सुरू आहे. शुक्रवारी या गदारोळामुळे दोन्हीही सभागृहांमधील कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते.

दुसरीकडे अदानी समूहाच्या शेअर्सच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. देशाच्या बाजारपेठेची योग्य प्रकारे काळजी घेतली गेली असून अदानी समूहाबाबत सुरु असलेल्या वादाचा गुंतवणूकदारांवर परिणाम होणार नाही, अशी अपेक्षा निर्मला सीतारमण यांनी व्यक्त केली आहे. त्याचवेळी अर्थमंत्री सीतारमण यांनी एसबीआय आणि एलआयसीबाबतही गुंतवणूकदारांना आश्वस्त केले आहे.

एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये निर्मला सीतारमण यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “एका घटनेवरून काहीही ठरवणे चुकीचे आहे. एसबीआय आणि एलआयसी पूर्णपणे सुरक्षित आहेत. इकडच्या-तिकडच्या लोकांच्या गोष्टी ऐकण्यापेक्षा या कंपन्यांच्या प्रमुखांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला हवा. एसबीआय आणि एलआयसी या दोघांनीही तपशीलवार याबाबत माहिती जारी केली आहेत. सध्या दोन्ही फायद्यात असून जी काही खरेदी झाली आहे ती विहित मर्यादेतच झाली आहे. मूल्यांकन कमी होत असले तरी दोन्ही कंपन्या सध्या फायदेशीर आहेत,” असे निर्मला सीतारमण म्हणाल्या.

भारताची स्थिती आजही पूर्वीसारखीच आहे. आमचा कामकाज चांगले आहे. सरकार स्थिर आहे आणि आम्ही बाजारावर चांगल्या प्रकारे लक्ष ठेवत आहोत. त्यामुळे आजही गुंतवणूकदारांचा विश्वास अबाधित आहे. भारतीय बँकिंग क्षेत्र देखील अतिशय सुरक्षित स्थितीत आहे. मी हे पूर्ण जबाबदारीने सांगत आहे, असेही निर्मला सीतारमण म्हणाल्या.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

5 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago