परीक्षा देण्यासाठी पोहचलेल्या केंद्रावर 500 मुलींमध्ये एकच मुलगा होता. परीक्षा आणि या मुलींचं टेन्शन घेऊन हा मुलगा चक्क बेशुद्ध पडल्याची आश्चर्यजनक घटना घडली आहे. बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील ही घटना आहे. या सगळ्या गोंधळातच या विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आता या प्रकाराची चर्चा सगळीकडे रंगते आहे.
बिहारशरीफच्या अल्लामा इक्बाल कॉलेजचा विद्यार्थी मनीस शंकर हा इंटर परीक्षेसाठी केंद्रावर पोहचला. त्याला ब्रिलियन्ट स्कूल हे केंद्र मिळालं होतं. मनीष सकाळी जेव्हा केंद्रावर पोहचला तेव्हा त्याला सगळीकडं मुलीच दिसत होत्या. सुमारे 500 मुली या केंद्रावर होत्या. आणि त्यात मनिष हा एकटाच मुलगा होता. आधीच परीक्षेचं टेन्शन आलेल्या मनिषला या मुलींमुळे अधिकचं टेन्शन आलं. त्याची प्रकृती बिघडली आणि तो परीक्षा केंद्रावरच बेशुद्ध पडल्याची घटना घडली.
परीक्षा केंद्रावर जास्त मुली पाहिल्यानं मनिष घाबरला आणि त्यामुळं तो बेशुद्ध पडला अशी माहिती त्याच्या काकूनं दिली आहे. त्यामुळे त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये अपचार करण्यात आले आणि आता त्याची प्रकृती ठीक असल्याचंही त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे. एकूणच मुलींचं टेन्शन घेून चक्कर येऊन पडलेल्या या मुलाची चर्चा सध्या चांगलीच रंगते आहे.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…