ताज्याघडामोडी

लेकीच्या लग्नाला यायचं हं! पत्रिका वाटायला निघाले बाबा, सोबत लेकालाही घेतलं; पण भलतंच घडलं

उत्तर प्रदेशच्या कन्नोजमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पिता पुत्राचा मृत्यू झाला आहे. लेकीच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी निघालेल्या वडिलांचा अपघातात शेवट झाला. बापलेकाच्या निधनाचं वृत्त समजताच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला.

तिर्वामधील नथापुरवा गावचे रहिवासी अवधेश दुबे यांची मुलगी कोमलचा १५ फेब्रुवारीला विवाह आहे. घरात लग्न असल्यानं अवधेश यांचा मुलगा आदित्य (२६) घरी आला. आदित्य २८ जानेवारीला घरी परतला. तो बरेलीतील फर्निचरच्या कारखान्यात काम करतो. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास अवधेश दुबे त्यांचा मुलगा आदित्यच्या सोबत लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी निघाले.

बापलेक बाईकवरून आमंत्रण पत्रिका वाटण्यासाठी जात असताना अपघात झाला. पाल चौकाजवळ असलेल्या बायपास येथून जात असताना त्यांच्या दुचाकीला ट्रकनं धडक दिली. अपघातात अवधेश आणि आदित्य गंभीर जखमी झाले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. दोघांनी हेल्मेट घातलेलं नाही. पितापुत्रांच्या निधनाबद्दल समजताच कुटुंबाला धक्का बसला. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. त्याला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

7 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

7 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago