आळंदी जवळील चऱ्होली बुद्रुक येथे मित्राची हत्या करून स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचल्याची घटना उजेडात आली आहे. हा सर्व खटाटोप प्रेयसीसोबत पळून जाण्यासाठी केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
सुभाष थोरवे असे 58 वर्षीय आरोपी प्रियकराचे नाव आहे. तर रविंद्र घेनंद अस हत्या झालेल्या मित्राचे नाव आहे. सुभाषच्या कुटुंबाने त्याचा अपघातात मृत्यू झाला असं समजून दशक्रिया विधी घातला.
सुभाष हा प्रेयसीसोबत जेजुरीत पळून गेला होता. स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचून मित्राची हत्या केल्याची माहिती प्रेयसीला देण्यात आली. त्यामुळं घाबरलेली प्रेयसीने घरी जाण्याचा तगादा लावला.
सोबत असलेले पैसे संपल्याने तो अत्यंत बिकट अवस्थेत होता. तो चुलत बहिणीकडे पायी जात असताना त्याला चोर समजून तेथील स्थानिक नागरिकांनी मारहाण देखील केली.
सुभाष थोरवेने स्वतः नाव सांगताच नागरिकांनी चुलत बहिणीला बोलावलं आणि सुभाषला बघताच बहीण बेशुद्ध पडली. स्थानिकांनी आळंदी पोलिसांना बोलावून सुभाषला ताब्यात दिलं आणि स्वतःच्या मृत्यूचा बनाव केल्याचं बिंग फुटलं.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…