पुणे हवामान विभागाने नुकताच एक अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. राज्यात कधीही 15 डिसेंबर पर्यन्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.
त्यामुळे ऐन हिवाळ्यात पाऊस पडणार असल्याचे चित्र निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसाठी हे धोकेदायक आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नुकसानीला तोंड देण्याची वेळ येते की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बेमोसमी पाऊसाने आधीच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात आता ऐन हिवाळ्यात पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यापासून बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण, काही भागांत हलका पाऊस तर काही ठिकाणी तुरळक जोरदार पाऊसही पडण्याची शक्यता आहे. मॅनदौस या चक्रीवादळामुळे दक्षिणेकडील राज्यांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रात 15 डिसेंबरपर्यन्त कधीही पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पुणे हवामान विभागाने पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. ऐन हिवाळ्यात आणि त्यातच कडाक्याची थंडी पडलेली असतांना हा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.
यंदाच्या वर्षी बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, शेतमाल हातातून गेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा असेच संकट आले तर शेतकरी पुरता हवालदिल होणार आहे.मॅनदौस या चक्रीवादळामुळे दक्षिणेकडील राज्यांत जोरदार पावसाची शक्यता, वर्तविण्यात आल्याने महाराष्ट्रात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…
'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…