तालूक्यातील सुरेगाव रास्ते येथे एक दुर्देवी घटना घडली आहे.शेतातील विहिरी जवळ असलेले मधाचे मोहोळ काढण्यासाठी गेलेला १२ वर्षीय बालक ऋषीकेश गजानन चव्हाण याचा मृत्यू झाला आहे. ऋषीकेश हा शनिवारी दुपारच्या सुमारास शेतात गेला. विहीरीजवळील मधाचे मोहोळ काढण्याचा तो प्रयत्न करीत होता. त्याचवेळी मधमाशा त्याच्यामागे लागल्याने त्याने तेथून पळ काढला. त्याचवेळी विहिरीच्या कठड्यावरुन त्याचा पाय घसरला. त्यामुळे तो विहिरीत पडला.
या दुर्घटनेत ऋषीकेशचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळी ४ पर्यंत तो घरी न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला. तो विहिरीत पडल्याच लक्षात आले. त्यानंतर विहिरीतून पाणी उपसल्यानंतर रात्री उशिरा त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…