ताज्याघडामोडी

‘विठ्ठल’चे चेअरमन अभिजित पाटील यांनी घेतली उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट

‘विठ्ठल’च्या जमिनीत एमआयडीसी उभारण्याचा प्रस्ताव सादर

पंढरपूर तालुक्यता एमआयडीसी झाली पाहिजे अशी मागणी गेल्या जवळपास ४० वर्षांपासून सातत्याने होत आली.पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथे ३५ वर्षांपूर्वी एमआयडीसी उभा करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला प्रशासकीय पातळीवर थोड्याफार हालचाली झाल्या पण पुन्हा ब्रेक लागला.यानंतर प्रत्येक विधानसभा निवडणुकीत पंढरपूर तालुक्यात एमआयडीसी नाही या बद्दल येथील तरुण पिढीकडून विशेत; सुशिक्षित बेरोजगार तरुणांकडून संताप व्यक्त करण्यात आला,दर नोकरी साठी पुण्या मुंबई सारख्या महानगराकडे धाव घेतलेल्या या शहर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या माता -पित्याकडून खंत व्यक्त करण्यात आल्याचे दिसून आले.
२०१२-१३ मध्ये स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या पाठपुराव्यामुळे पंढरपूर तालुक्यात एमआयडीसी उभारण्यासाठीच्या जागेचा शोध घेण्यासाठी उद्योग मंत्रालयाचे श्री कोमल हे अधिकारी सहकाऱ्यासह आले आणि धोंडेवाडी,मेंढापुर येथील जागेची पाहणी करून परत गेले.
      तर मागील दोन महिन्यापासून राज्यात सत्तांतर होताच पंढरपूर -मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर तालुक्यात एमआयडीसी झाली पाहिजे यासाठी जोरदार पाठपुरावा सुरु केला.राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत बैठकही झाली आणि पंढरपूर एमआयडीसी साठी प्रस्तावित जागेची पाहणी करण्यासाठी एक पथकही पंढरपूर तालुक्यात आले.कोर्टी,कासेगाव-बोहाळी आणि रांझणी परिसरातील जागेची पाहणीही केली पण या परिसरातील शेतकऱ्यांकडून विरोधाचा सूर आळवला जाऊ लागला.मागील काही वर्षांपासून कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे पदाधीकारी कासेगावच्या शेतकऱ्यांना घेऊन विरोध करू लागले.त्यामुळे जागेअभावी पुन्हा पंढरपूर एमआयडीसी रखडणार अशी चिंता सतावू लागली.
    मात्र २६ सप्टेंबर रोजी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाण्याचा वार्षिक सर्वसाधारण सभेत विठ्ठल सहकारी साखर कारखाण्याच्या सभासदांसमोर चेअरमन अभिजित पाटील यांनी एक प्रस्ताव मांडला.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे अतिरिक्त असलेली २५० एकर जमीन एमआयडीसी साठी भाडेतत्वावर देण्याचा.त्याच बरोबर या जागेभोवतीचे अनेक शेतकरी एमआयडीसी साठी जमीन देण्यास तयार असल्याचे देखील चेअरमन अभिजित पाटील यांनी सांगितले.आणि सभासदांनी या ठरावावर एकमताने शिक्कामोर्तब केले.
     आज गुरुवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेत उद्योगांना आवश्यक असणाऱ्या वीज, रस्ते आणि पाणी ३ या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा आधीपासून उपलब्ध असल्याने उद्योगांसाठी आणि सरकारसाठी या ठिकाणी “एम.आय.डी.सी.” उभारणी करणे सोयीचे आहे हे नामदार उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे माढा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कोकाटे,सोलापूर संपर्क प्रमुख महेश साठे आदी उपस्थित होते.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

11 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

7 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago