राज्यातील काही भागांत २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
२६ सप्टेंबर रोजी परभणी, नांदेड, लातूर, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोलीसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर २७ सप्टेंबर रोजी जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा या भागासाठी यलो अलर्ट दिला आहे.
२८ सप्टेंबर रोजी देखील मराठवाडा आणि विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.गेल्या २४ तासांत राज्यातील बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस स्वरुपाचा पडला आहे. येत्या २, ३ दिवसांतही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
मुंबई आणि शहरात शुक्रवारी विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी सकाळी पुन्हा हजेरी लावली. सकाळी ७ ते ८ या तासाभरात रावळी कॅम्प येथे सर्वाधिक २८ मिमी तरसायन माटुंगा येथे २१ मिमी पावसाची नोंद झाली. पूर्व पश्चिम उपनगरातही तासाभरात मुसळधार पाऊस झाला.मुंबईत गेल्या दोन आठवड्यांपासून पडत असलेल्या पावसाने काल (शुक्रवार) थोडी उसंती घेतली.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…