ताज्याघडामोडी

पत्नीला घाबरवण्याच्या नादात पतीला लागला गळफास

विरार मध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीला घाबरवण्याच्या नादात पतीला गळफास लागला आहे. यामध्ये पतीचा जागीच मृत्यू झाला आहे.

विरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार पूर्वेतील वीर सावरकर मार्ग परिसरातील लक्ष्मीनिवास या ठिकाणी सात दिवसांपूर्वीच मयत भगवान रामजी शर्मा वय वर्ष 35 आणि त्याची पत्नी चांदणी देवी वय वर्ष 25 हे राहायला आले होते. हे दोघेही एका खाजगी कंपनीत कामाला होते. पत्नी चांदणी देवी यांनी पती रामजी शर्मा यांच्याकडून दोन हजार रुपये उसणे म्हणून घेतले होते. त्यातून त्यांनी स्वतःसाठी नवीन कपडे घेतले होते. परंतु तिने केवळ 1500 रुपये परत केले आणि 500 रुपये नंतर देते असे सांगितले.

याच गोष्टीचा राग आल्याने पतीने पत्नीने घेतलेले नवीन कपडे फाडून आत्महत्या करण्याची धमकी देत, नवीन कपड्यातील एक कपडा घेऊन बेडरूम मध्ये जाऊन गळफास लावून घेण्याचा बनाव आणत असतानाच फास लागून त्याचा मृत्यू झाला. बराच वेळ झाला पती दरवाजा उघडत नसल्याचे पाहून पत्नीने शेजारच्यांना बोलावून दरवाजा तोडला असता सर्व प्रकार उघडकीस आला. या घटनेची विरार पोलिसांनी पंचनामा करत अकस्मात मृत्यूची नोंद केली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

4 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

7 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

3 weeks ago