ताज्याघडामोडी

पत्नीच्या मृतदेहासोबत पतीचा 500 किमी ट्रेनने प्रवास

औरंगाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पतीने मृत पत्नीसोबत 500 किलोमीटरचा ट्रेनने प्रवास केल्याची घटना घडलीय. विशेष म्हणजे या घटनेची सहप्रवाशांना देखील कल्पना नव्हती.पतीला सुद्धा पत्नीची मृत्यू झाल्याची माहिती नव्हती. मात्र नंतर ट्रेनमध्ये घडलेल्या एका घटनेनंतर या घटनेचा उलगडा झाला. 

पती आपल्या आजारी पत्नीला घेऊन लुधियानाला उपचारासाठी जात होता. यावेळी ट्रेनमध्ये काही अंतरावर पोहोचताच तिची तबीयत आणखीणच खालावली होती. या दरम्यानचं तिने पतीच्या मांडीवरच प्राण सोडला होता. मात्र याची पतीसह सहप्रवाशांना कल्पनाच नव्हती. पतीला ती झोपली असल्याचे वाटल्याने त्याने तिच्यावर चादर ओढली होती. असा साधारण त्याने 500 किमी अंतर पार केले होते. 

टीसी चढला ट्रेनमध्ये 

प्रवासादरम्यान गाडी महत्त्वाच्या स्थानकात पोहोचताच टीसीने ट्रेनमध्ये प्रवेश केला होता. यावेळी टीसीने सर्व प्रवाशांची तिकीट तपासण्यास सुरुवात केली. तिकीट चेक करता करता टीसी त्या पतीजवळ पोहोचला होता. टीसीने पतीला तिकीट विचारले व पतीला उठवण्यास सांगितले. यावेळेस पतीला जाग करताना त्याला पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

4 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

1 week ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

3 weeks ago