ताज्याघडामोडी

ओबीसी आरक्षणासंदर्भात विशेष खंडपीठ स्थापन केले जाणार

पुढील पाच आठवड्यांसाठी परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश 

ओबीसी राजकीय आरक्षणाक्षणाचा मुद्दा राजकीयदृष्ट्या तापलेला आहे. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने पुढील पाच आठवड्यांसाठी परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत  सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ओबीसी आरक्षणासंदर्भात विशेष खंडपीठ स्थापन केले जाणार आहे. बांंठिया आयोगात त्रुटी लक्षात आल्यानंतर न्यायालयाने यावर स्थगिती दिली होती. यावर आता सर्वोच्च न्यायालयाने पुढील पाच आठवडे परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आधीच घोषित झालेल्या 367 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आरक्षणाशिवायच घ्याव्या लागणार, अशी परिस्थिती आहे. सर्वाच्च न्यायालयाचा हा निर्णय S राज्य सरकारला मोठा दणका असल्याचे मानले जात आहे.

ओबीसांची आरक्षण बांठिया आयोगाने तयार केलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केल्यानंतर पूर्ववत करण्यात आले होते. तथापि, या अहवालात त्रुटी आढळल्या होत्या. त्यामुळे या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. त्याशिवाय 367 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याआधीच घोषित करण्यात आल्या होत्या. या निवडणुकाही ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने सध्या असलेली परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील पाच आठवड्यांसाठी हा आदेश देण्यात आला आहे.

महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्या. अभय ओक, न्या. जे. बी. पार्दीवाला यांनी हे आदेश दिले. २० जुलै आणि २८ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश मागे घेण्यात यावेत अशी विनंती राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या सरकारने दाखल केलेल्या याचिकेमध्ये केली होती. ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकांसंदर्भात राज्यातील निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निर्देशांना मागे घेण्याची विनंती केली होती. परंतु न्यायालयाने परिस्थिती जैसे थे ठेवावी असे आदेश दिले आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

5 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago