देशभरात मॉन्सून आता सक्रीय झाला आहे. आता काही राज्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. हा पाऊस शेतीसाठी फायदेशीर आहे. भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेशसह काही राज्यात आगामी 24 अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
बिहार, ओदिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू कश्मीरमध्येह हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.
मुंबईमध्ये पावसाने थोडी उसंत घेतली आहे. मात्र, आगामी 24 तासात मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने याबाबत अलर्ट जारी केला आहे.
तसेच या काळात हायटाईड येण्याची शक्यता असल्याने चौपाटी किंवा समुद्रकिनारी जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत शनिवारी हाय टाईड येण्याची शक्यता असल्याने समुद्रकिनारी आणि चौपाट्यांवर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या काळात 3.6 मीटरच्या म्हणजे सुमारे 11 फूटांच्या लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राजधानी दिल्लीत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्लीत तापमानात घट होत ते 38 अंशसेल्सिअसपर्यंत आले आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा, सिवनी, बालाघाट, मंडला, बुरहानपूर, खंडवा या भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…
'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…