कोरोनाबाधितांमध्ये संथपणे वाढ होत असल्याचे निदर्शनास येत असून जनतेने मास्क वापरत रहावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून जनतेला केले.राज्याची साप्ताहिक संसर्ग दर १.५९ टक्के असून, मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक संसर्ग दर आढळून आला आहे. मुंबईत रुग्णसंख्येत ५२.७९ टक्के वाढ झाली असून, ठाण्यामध्ये २७.९२ टक्के तर रायगड आणि पालघर जिल्ह्यात १८.५२ टक्के ६८.७५ टक्के इतकी वाढ झाली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वरीलप्रमाणे आवाहन केले. सध्या१८ पेक्षा अधिक वयाच्या ९२.२७ टक्के लोकांना एक डोस देण्यात आला आहे. चाचण्यांचे प्रमाणही कमी झाले असून, ते वाढविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
राज्यात आढळणारे काेराेना रूग्ण
२६ मे ५११
२५ मे ४७०
२४ मे ३३८
२३ मे २०८
२२ मे ३२६
२१ मे ३०७
२० मे ३११
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…