विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणूक निर्णयावर आक्षेप घेतल्याच्या रागातून विरोधी पक्षातील टोळक्याने एकाच्या घरी जात संसार उपयोगी साहित्यांची तोडफोड करत तिघांना मारहाण केली.
ही घटना रविवारी संध्याकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास उरळीकांचनजवळ पांढरस्थळ वस्तीवर घडली. अनिकेत राजेंद्र कांचन, वरूणराज संजय कांचन अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अर्जुन रामचंद्र कांचन (वय 46 )यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
अर्जुन हे पांढरस्थळ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणूकीला उमेदवार होते. त्यांच्या गटातील तीन लोक विजयी झाले होते. मात्र, अर्जुन यांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता. त्याचा राग आल्यामुळे विरोधी गटातील अनिकेत आणि वरूणराज यांच्यासह इतरांनी 22 मे रोजी अर्जुन यांच्या घरी राडा घातला. त्यांच्या घरातील टेबल, सोफा, फ्रीजसह इतर साहित्यांची तोडफोड केली. अर्जुन यांच्या आई, पत्नी आणि मुलीला मारहाण करून शिवीगाळ केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे तपास करीत आहेत.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…