मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेवरुन मोठा राजकीय वाद उफाळला आहे. राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये भाषण करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत उल्लेख केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. तसेच त्यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावरुन 4 तारखेपासून ऐकून घेणार नाही, अशी भूमिका मांडली.
राज ठाकरेंच्या या भाषणानंतर त्यांच्यावर महाविकास आघाडी आणि काही संघटनांकडून टीका केली जात आहे. विशेष म्हणजे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी तर राज ठाकरे यांच्या भाषणावरुन त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
“राज ठाकरे जातीवादाचं राजकारण करत आहेत. त्यांना अटक करुन शांतता प्रस्थापित करा. आम्ही या प्रकरणी शरद पवार यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे खोटा इतिहास पसरवत आहेत. त्यामुळे त्यांना अटक करा”, अशी भूमिका प्रवीण गायकवाड यांनी मांडली आहे.
“जेम्स लेन यांचं मूळ पुस्तक आणि बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेलं पुस्तक यातील शिवाजी महाराज जन्म आणि दादोजी कोंडदेव यांच्याबाबत केलेलं लिखाण सारखं आहे. नंतर जेम्स लेन यांच्या पुस्तकाच्या कॉपी आलेली आहे. त्यात मग दादोजी कोंडदेव यांच्याबाबत लिहिलेलं लिखाण का वगळलं?”, असा सवाल प्रवीण गायकवाडांनी केला.
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…