समाजाचे, नागरिकांचे, राज्याचे रक्षक असलेल्या पोलिसांच्या पाठीशी हे सरकार असल्याचे वेळोवेळी दाखवून दिले आहे. पोलिसांना राहण्यासाठी घरे, पोलीस ठाणे, सुविधा या प्रत्येक बाबतीत आपल्या सरकारने केवळ विचार न करता सकारात्मक कृती केली आहे.
काही जणांना चांगली कामे पाहवत नाहीत, म्हणूनच ते पोलिसांना माफिया वगैरे म्हणत त्यांची बदनामी करतात. असे मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. शनिवारी पोलिसांच्या 112 हेल्पलाईन आणि CCPWC प्रणालीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
पोलिसच आपले रक्षक असल्याचे अनेक जण विसरून जातात. पण मला अगदी लहानपणापासूनच पोलिसांचा अभिमान आहे. पूर्वीच्या पोलिसांचा युनिफॉर्म वेगळा होता. त्यावेळी हाफ पॅण्ट असलेला निळा गणवेश आणि हातात दंडुका घेतलेल्या पोलिसाला आपण पाहायचो. आता काळ बदलला आहे, नवीन हत्यारे उपकरणे आली आहेत. त्यामुळे गुन्हेगाराच्या एक पाऊल पुढे जाऊन पोलिसांना विचार करण्याची गरज भासू लागली आहे.
पोलीसाचा धाक व दरारा वाटेल असे त्यांचे व्यक्तिमत्व असायलाच हवे. आपण अजूनही कसाबला विसरलेलो नाही. कोणाच्या ध्यानीमनी नसताना अतिरेकी किती विचारपूर्वक आणि शस्त्रसज्ज होऊन मुंबईत घुसले. पण तुकाराम ओंबाळे सारख्या शूर पोलीस हवालदाराने जीवाचे बलिदान दिले पण त्यापूर्वी त्या अतिरेक्याला रोखले.
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…
'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…