गुटख्याची सुपारी अन्ननलिकेत अडकली,ठसला लागला गेला जीव

शहरातील उस्मानपुरा भागात एक आगळेवेगळी घटना समोर आली असून, पाच रुपयांच्या गुटख्यामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. तोंडात गुटखा टाकल्यानंतर ठसका लागला ज्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. गणेश जगन्नाथ दास ( वय ३७, रा.पद्मपाणी, रेल्वे स्टेशन ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हा एका खाजगी कंपनीत कामाला होते. दरम्यान कंपनीच्या मालकाच्या घरी डिश टीव्ही बसवण्यासाठी ते गेले होते. गणेश यांना गुटखा खाण्याची सवय असल्याने डिश टीव्ही बसवत असताना त्यांनी गुटख्याची पुडी फोडून ती तोंडात घातली. याचवेळी त्यांना जोरोचा ठसका लागला आणि ते बेशुद्ध होऊन पडले.

गणेश बेशुद्ध होऊन खाली पडताच त्यांना तात्काळ घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी गणेश यांना तपासुन मयत घोषित केले. शुक्रवारी शवविच्छेदनाचा अहवाल आला असून, गणेश यांच्या अन्ननलिकेत सुपारीचा खांड अडकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच समोर आलं आहे. याप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राज्यात गुटखा विक्रीवर बंदी आहे. मात्र असे असतानाही अवैधपणे गुटखा विक्री सर्वच ठिकाणी सुरू आहे. विशेष म्हणजे तरुण मुलंसुद्धा गुटख्याच्या विळख्यात अडकली आहे. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात सर्वच ठिकाणी अशीच परिस्थिती आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

3 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

6 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago