याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश हा आपली पत्नी कावेरी सोबत ‘वाडी वाकद’ शिवारात शेतात गोठ्यावर राहत असे. त्यांना तीन मुली आहेत. सुरेश हा नेहमी कावेरीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यातून नेहमीच दोघांची भांडणे व्हायची, त्याला दारूचे व्यसन जडले आहे.
काल पुन्हा त्यांचं कडाक्याचं भांडण झालं त्यात सुरेशने कावेरीला बेदम मारहाण केली. त्यानंतर ती जीव वाचवण्यासाठी गावाकडे पळत गेली व तिने सर्व हकीकत आपल्या दिराला सांगितली. त्यानंतर तिचा दीर व गावातील भावकीची काही मंडळी हे शेतात गोठयावर गेले असता तिथे चिमुकली कुठेही दिसत नव्हती. याबाबत त्यांनी सुरेशला विचारणा केली तर त्याने ही आपली पोरगी नसून आपण तिला जिवंत गाडून टाकले असल्याचे सांगितले. त्याने दाखवलेला खड्डा गावकऱ्यांनी उकरून पाहिला असता त्यात चिमुकली निपचित पडली होती. तिचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवेंद्रसिंग ठाकूर यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व आरोपी निर्दयी पिता सुरेशला अटक केली आहे.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…