पत्नीसह मुलीची गळा चिरुन हत्या नंतर पतीनेही उचललं टोकाचं पाऊल

नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि 13 वर्षीय मुलीची गळा चिरुन हत्या केली आहे. पत्नी आणि मुलीची हत्या करुन आरोपी पतीने टोकाचं पाऊल उचललं आहे. आरोपी पतीने स्वत: देखील गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. नागपुरातील हिंगणा एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या राजीव नगर येथे ही घटना घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नागपुरातील राजीव नगर तरोडा मोहल्ल्यात ही घटना घडली आहे. मृतक व्यक्तीचं नाव विलास गवते असल्याची माहिती समोर आली आहे. विलास गवते याने रात्रीच्या सुमारास आपल्या पत्नी आणि मुलीची गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली.

प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून विलास गवते या व्यक्तीने हे कृत्य केलं असल्याचं बोललं जात आहे. मध्यरात्री संपूर्ण गवते कुटुंब झोपलेले होते. त्यावेळी विलास गवते याने आपली पत्नी रंजना आणि 13 वर्षीय मुलीची गळा चिरुन हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

 

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

4 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

7 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago