राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज जळगावात बोलताना म्हटलं आहे की, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे ऊर्जा स्त्रोत आहेत. समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचं माझ्या वाचनात आलं होतं.
मात्र इतिहासातील काही नवीन तथ्य लोकांनी मला सांगितली आहेत. या तथ्यांनुसार मी माहिती घेतो आणि त्यानंतर पुढे काय करायचं तो निर्णय घेतो,’ अशी प्रतिक्रिया जळगावात कोश्यारी यांनी दिली आहे. जळगाव विद्यापीठातील जलतरण तलावासंदर्भातील एका कार्यक्रमाला ते उपस्थित होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर कोश्यारी यांनी वादाबाबत आपली बाजू मांडली आहे.
तुम्ही केलेल्या वक्तव्यावर माफी मागण्याबाबत तुमचा काय विचार आहे, असं राज्यपाल यांना विचारलं असता त्यांनी पत्रकारांशी अधिक बोलणं टाळत निघूण जाणं पसंत केलं.
नेमका काय आहे वाद?
औरंगाबादेतील कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. ‘समर्थ रामदास नसते तर शिवाजी महाराज काय असते? समर्थ नसते तर शिवाजी महाराजही नसते,’ असं भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं होतं.
गुरूचं महत्व सांगताना आपण हे वक्तव्य केल्याचं राज्यपालांचं म्हणणं आहे. मात्र या वक्तव्यातून शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आणि राज्यभर कोश्यारी यांच्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…