ताज्याघडामोडी

लग्नाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाची झडप, भीषण अपघातात 9 जणांचा चिरडून मृत्यू

लग्नासाठी गेलेल्या एका कुटुंबावर काळानं घाला घातला आहे. लग्न उरकून घरी परतत असताना झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा चिरडून मृत्यू  झाला आहे. हा अपघात इतका भयंकर होता की, या घटनेत कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

या अपघातात मृत पावलेल्यांमध्ये एका बालकासह सहा महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. यातील आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकाचा रुग्णालयात जाताना वाटेतच मृत्यू झाला आहे. लग्नाहून परतणाऱ्या कुटुंबाचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात आंध्र प्रदेशातील अनंतपुरम-बेल्लारी राष्ट्रीय महामार्गावरील बुडागवी गावाजवळ झाला आहे. याठिकाणी भरधाव वेगाने आलेल्या एका ट्रकने इनोव्हा कारला जोरदार धडक दिली आहे. हा अपघात इतका भयंकर होता की आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य एकाची रुग्णालयात जाताना प्राणज्योत मालवली आहे.

संबंधित सर्वजण उरवाकोंडा येथील रहिवासी असून ते कर्नाटकातील बेल्लारी याठिकाणी लग्न समारंभासाठी गेले होते. लग्न उरकल्यानंतर हे कुटुंब आपल्या इनोव्हा कारने परत आपल्या घरी परतत होतं. लग्नाहून परतत असताना अनंतपुरम-बेल्लारी राष्ट्रीय महामार्गावरील कोटलापल्ली भागात समोरुन भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली.

या अपघातात कारमधील नऊ जणांचा चिरडून मृत्यू झाला आहे. तर कारचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची ही घटना समोर येताच उरवाकोंडा गावावर शोककळा पसरली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

20 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago